![](https://i0.wp.com/sulekhablog.com/wp-content/uploads/2023/06/Elephanta_Caves_Trimurti-900x1024.jpg?resize=682%2C776&ssl=1)
शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड,धातू,लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती,हेच,पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय.शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस ‘ शिल्प ‘ असे म्हणतात.
भारताच्या स्थापत्य, शिल्पकला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसतात.भारतीय शिल्पकलेचे सुरूवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केले आहे.ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ अमर, लवचिक अवयव आणि एक तरुण आणि संवेदनशील रूप
दर्शवते भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप,शैलगृहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे,जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो.
भारतीय शिल्पकलेची माहिती घेतांना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल.
सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वआस्तूशइल्प आणि मूर्तिकला यांचा समावेश होतो.सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती,मुद्रिका हा सुध्दा कलेचा नमुना समजला जातो.
मुद्रिकावर बैल,गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात.या काळातील नगराच्या रचनेत उत्तम भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो.सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था हे ही या काळाचे एक वैशिष्टय होय.स्नानाचे कुंडे,गोदामे,जहाज दुरूस्ती करण्याची गोदी अशा वास्तू या सिंधू संस्कृतीच्या वास्तू कलेची माहिती मूर्ती, मुद्रिका हा सुध्दा कलेचा नमुना समजला जातो.मुद्रिकावर बैल, गेंडा,, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात.पशूपती ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा म्हणून ओळखली जाते.ही संस्कृती नागर
संस्कृती होती.त्यामुळे आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचे कलेचे आविष्कार हे यामध्ये पाहायला मिळतात.भारतीय शिल्पकला जाणणे आवश्यक आहे.
संस्कृत साहित्यात मूर्तीकलेचे शास्र विकसित झालेले आढळते.मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरणं आहे.त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे.भारताच्या स्थापत्य शिल्पकला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसते.भारतीय शिल्पकलेने
सुरूवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केले आहे.ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ अमर, लवचिक अवयव आणि एक तरुण आणि संवेदनशील रूप दर्शवते.भारतीयशिल्पांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांपासून बनवलेल्या असंख्य देवतांचे चित्रण करण्यात आले आहे.
![](https://i0.wp.com/sulekhablog.com/wp-content/uploads/2023/06/shilpkala-1024x683.jpeg?resize=769%2C512&ssl=1)
सिंधू खोरे सभ्यता, भारतातील मोहेंजोदरोचे मोठे जलसाठे प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.दक्षिणेकडील कांचीपुरम,मदुरै श्रीरंगम आणि रामेश्वरम् आणि उत्तरेकडील वाराणसीची मंदिरे ही भारतातील भरभराट झालेल्या कलेचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे. इतकेच नाही तर मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिर आणि ओरिसाच्या सूर्यमंदिरात या कलेचा जिवंत देखावा आहे.सांचीस्तूप,शिल्पसुध्दा अतिशय भव्य आहे.जे ईसापूर्व तिसऱ्या शतकातील आहे.तसेच सभोवतालची जंगले ( बलसट्रेडस् ) आणि तोरणांचे दरवाजे सुशोभित करीत आहे.ममल्लापुरमचे मंदिर,सारनाथ संग्रहालयाची लायन कॅपिटल,ही मोरयाची मूर्ती आहे.अमरावती महात्मा बुध्दांच्या जीवनातील घटना आणि नागार्जुन घोंडाच्या स्थापत्य शिल्पांचे वर्णन करणारे इतर उदाहरण आहेत.
मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये हिंदू गुहेच्या स्थापत्य वास्तूचा कळस दिसतो.आणि त्याचप्रमाणे एलोराच्या हिंदू आणि जैन खडकांच्या मंदिरांमध्ये, विशेषतः आठव्या शतकातील कैलास मंदिरही या वास्तूकलेच्या रूपात पाहिले जाऊ शकते.
लाकडातून किंवा दगडातून शिल्पाकृती कोरून काढण्याची परंपरा आजही प्रचलित आहे.
प्राचीन इजिप्त, मेसोपोटेमिया ( इराक ) ,ग्रीस, पर्शिया ( इराण ) येथील संस्कृतीमध्ये या तंत्राचा विकास पूर्णत्वाला पोहचलेला दिसतो.भारतीय परंपरेमध्ये मात्र मौर्यकाळाच्या आधी फारसे प्रगत शैलशिल्प सापडत नाही.सिंधूसंस्कृतीमधील काही पाषाणशिल्पे मिळतात.पण ती तांत्रिकदृष्ट्या प्राथमिक अवस्थेत आहेत.अशोकस्तंभ प्रगत पाषाणशिल्पाचे उदाहरण ठरावेत.परंतु त्यांची उपरी शैली आणि भारतीय परंपरेतील या आधीच्या काळातील शैलशिल्पांचा पूर्ण अभाव लक्षात घेता.हे तंत्र आणि तंत्रज्ञही इराण मधून आलेले असण्याची शंका उद्वभवते.या शैलीतील शिल्पे अशोकाच्या मृत्यूनंतर भारतात क्वचित आढळतात.ही
वस्तुस्थिती वरील संशयाला पुष्टी देते.त्यामुळे शैलशिल्पांचे एतद्देशीय तंत्र आणि शिल्पकला यांचा उगम आपल्याला शुंग-सातवाहन काळातच हुडकावा लागतो.( इ.स.पू.पहिले – दुसरे शतक ) भारतीय शैलशिल्प
सुरूवातीपासूनच अनेकविध जातींच्या पाषाणात कोरले गेले आहे.विविध दर्जाचे आणि पोतांचे वालुकाश्म ,
सुमारास ( शिस्ट ) सारखे ठिसूळ त्यांचे खडक, सह्याद्रीच्या रांगामधील काळा अग्निजन्य खडक,संगमरवर,
यांसारख्या हाती येईल त्या दगडांशी भारतीय शिल्पींची छिन्नी भिडली आहे.अतिशय भरड पाषाणालाही तिने दैवी सौंदर्य बहाल केले आहे.